मनाचे विचार

 

नमस्कार,
 मनाचे विचार या विषयावर बोलणार आहोत. विचार ही एक अशी शक्ती आहे, ज्याच्या बरोबर तुम्ही जग जिंकू शकता. तुम्हाला जर जगात चांगला माणूस व्हायचा असेल, तसेच तुमचं कार्य जगाला दाखवायचं असेल तर योग्य विचार करणे फार महत्त्वाचेआहे.
एका दिवसामध्ये  माणसाच्या मनात हजारो विचार येतात. जे विचार सकारात्मक असेल तर तुम्हाला सकारात्मक अनुभव येतो. आणितेच विचार जर नकारत्मक  असले तर वाईट परिणाम दिसून येतात. म्हणून माणूस जसा विचार करतो, तसे त्याचे जीवन असते. समोरचीव्यक्ती जर तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल, तसेच तुमचा तिरस्कार करत असेल, आणि तुमची बदनामी करत असेल तर समजूनघ्यायचे की आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईट विचार आहे. म्हणून तो तसा तुमच्या बरोबर वागतो.
समोरच्या वेक्तीला पाहिल्यावर राग येतो. आजचा दिवस अशुभ आहे. मला यश मिळणार नाही. माझ्या हातून खूप चुका होत आहेत. मला चांगली संधी मिळत नाही. सर्व माझ्या विरोधात आहे. हे नकारात्मक विचार माणसाच्या दुःखाला कारणीभूत असतात. यामुळेनिराशा वाढते. उत्साह कमी होत जातो. आत्मविश्वास कमी होतो. या सर्वांचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोच पण तुमच्या  सुखीजीवनाला धोका निर्माण होतो. त्यामुळे माणूस आजारी पडू शकतो. आणि नैर्राष्य सुद्धा येते. त्यामुळे सकारात्मक विचार करायला हवेत.
जास्त प्रमाणात आपण दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक विचार करू, तेवढे तुमचे जीवन एक सुखी होत जाते. आणि त्याचबरोबर एकजगण्याचा नवा मार्ग सापडतो. आणि इतरांना सुद्धा तुम्ही उत्साह देण्याचा प्रयत्न करू शकता. त्यामुळे सकारात्मक विचार फार महत्त्वाचेअसतात. जर तुम्हाला वाटत असेल की मी खूप गरीब आहे. माझ्याकडे पैसे नाही. किंवा मला कोणी मदत करत नाही. तर ही चूकतुमचीच आहे. कारण तुम्ही सतत नकारात्मक विचार करता, त्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही. आणि तुम्ही दोष दुसऱ्यावर ढकलून मोकळे होता. या कारणांमुळे तुमची प्रगती होत नाही.
तुम्हाला जर चांगली माणसे आणि वाईट माणसे ओळखायचे असेल तर, त्या व्यक्तीबरोबर १५ ते २० मिनिटं बोला तर तुम्हाला त्यांच्याबोलण्यातून त्यांचे विचार समजतील. आणि त्याचबरोबर त्याचा स्वभाव कसा आहे. ही व्यक्ती आपल्यासाठी धोक्याची आहे की नाही हे लगेच समजून जाईल.