लोहगड किल्ला

लोहगड किल्ला, पुणे लोणावळा

 

आज आपण पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड या किल्ल्याची माहिती पाहणार आहोत.
कोणत्याही किल्ल्यासाठी भौगोलिक स्थान फार महत्त्वाचे असते. लोणावळ्या नजीकच्या  मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक रांग आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या  धरणाचे सुंदरदृश्य दिसते.  पलीकडेच त्रिकोणा उर्फ वितंडगड नावाचा अजून एक  किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगडही येथेच आहे. नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वत रांगा मधील हा दुर्ग बांधला आहे.

लोहगड किल्ल्याचा इतिहास :-

लोहगड किल्ला हा अति मजबूत आणि बुलंद आहे. जवळच असणारी भाजी आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू.  २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे मानले  जाते.  सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.
इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने  निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होता.  इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण  निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला. Ani पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी परत जिंकला. पहिल्या सुरत lutichya वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकranni लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३ मध्ये शाहू महाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे yanna दिला. १७२० मध्ये kanhoji angre कडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीsancha सरदार जावजी  बांबळे यांनी तो आपल्या ताब्यात घेतला.
१८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावांनी तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर हा  लोहगड जिंकण्यासाठी आला. त्यांनी सर्वप्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावांनी गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हुकूम धिला.  तेथून  मराठे मागे फिरले.

 

किल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे  :-

  1. गणेश दरवाजा  :- गणेश दरवाजाच्याच बाजूला म्हणजेच डाव्या-उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबांचा नरबळी देण्यात आला होता. आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची  पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेखात उल्लेख केलेला आहे. या घटनेवरून असे दिसून येते की त्या काळी सुद्धा नरबळीची अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात चालू होती.
  2. नारायण दरवाजा  :- हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. येथे एक भुयारी मार्ग आहे. जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येत असे.
  3. हनुमान दरवाजा  :- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. हा दरवाजा कधी बांधण्यात आला याचा उल्लेख कुठे ही आढळून येत नाही.
  4. महादरवाजा  :- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. महादरवाजातून आत शिरताच  एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी  आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.
याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिमेंटच्या चौथऱ्यात बसवली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मीकोठी लागते. या कोठीत राहण्याची सोय होती. कोठीत अनेक खोल्या आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तेथे एक शिव मंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे.
तिथून पुढे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे दिसते.  नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळाकोणी आहे. मोठ्या तळ्याच्या पुढे विंचूकड्याकडे जाताना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचू काटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचू काट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगी सारखा दिसतो. म्हणून या जागेला विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी या इंचूकाट्याचा उपयोग केला जात असे.